स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठं आर्थिक संकट

रघुराम राजन यांचा मोदी सरकारला इशारा


नवी दिल्ली - 'भारत स्वातंत्र्यानंतरच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाच्या टण्यात आहे. सरकारने है शाळदान पेलण्यासाठी विरोधी पक्षांसोबत तज्ञांची मदत घेतली पाहिजे, असं मत रिझव्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केलंय. देशात करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आव्हानांबद्दल त्यांना खास ब्लॉग लिहिला असून, त्यात त्यांनी सरकारला पुढील संकटाबद्दल सतर्क करण्याचा प्रयत केला आहे.


२००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक संकटाची नांदी रघुराम राजन यांनीच सर्वात आधी दिली होती. त्यानंतर जगातील अर्थतज्ञांनी त्यावर आपले मत व्यक्त केले होते. आताही रघुराम राजन याना सरकारला पुढाल रघुराम राजन यांना सरकारला पुढील आर्थिक आरिष्टाबद्दल जागं करण्याचा प्रयत्न केलाय आहे. रघुराम राजन यांनी 'Perhaps India's Greatest Challenge in Recent Times' या शिर्षकाने ब्लॉग लिहिला आहे. __रघुराम राजन यांनी म्हटलं आहे की, स्वातंत्र्यानंतर भारतासमोरचं हे कदाचित सर्वात मोठं संकट आहे. २००८-०९ मध्ये आलेल्या जागतिक आर्थिक संकटावेळी मागणीत खूप मोठ्या प्रमाणात घट झाली होती. पण तेव्हा कामगार कामावर जात होते. कंपन्या इतक्या वर्षांच्या नफ्यामुळे मजबूत होत्या. देशाची आर्थिक व्यवस्था चांगल्या स्थितीत होती. तसंच सरकारची अर्थप्रणालीही निरोगी होती. पण आज जेव्हा आपण करोना व्हायरसशी लढा देत आहोत तेव्हा यापैकी काणताच ग कोणतीच गोष्ट आपल्याकडे नाही,' असं रघुराम राजन यांनी स्पष्टपणे सांगितलं. सरकारने गरिबांवर खर्च करण्यासाठी प्राथमिकता दिली पाहिजे. गरज नसलेला खर्च टाळला पाहिजे, असं मतही राजन यांनी व्यक्त केल आहे. गरिबांवर खर्च करणे योग्य पाऊल असेल असं सांगताना त्यांनी म्हटलं आहे की, 'अमेरिका आणि यरोपध्ये रेटिंग खाली आली असतानाही कोणत्याही भीतीविना जीडीपीचा १० टक्के खर्च केला जाऊ शकतो पण आपण आधीच मोठ्या वित्तीय तुटीसहित या संकटात प्रवेश केला आहे आणि आपल्याला अजून अधिक खर्च करावा लागणार आहे'.


अनुभवी लोकांची सरकारने मदत घ्यावी  'सध्या सरकारला खूप काही करण्याची गरज आहे. सरकारने ज्यांच्याकडे अनुभव आणि क्षमता आहे अशा लोकांना बोलावलं पाहिजे. भारतात असे अनेक लोक आहे जे सरकारला अशा परिस्थितीतून बाहेर पडण्यात मदत करु शकतात. सरकार राजकारणाच्या सीमा ओलांडून विरोधी पक्षाची मदत घेऊ शकतं, ज्यांच्याकडे जागतिक आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा अनुभव आहे,' असंही रघुराम राजन यांनी सांगितलं आहे.